ताज्या घडामोडी

मांजरा धरणाचे दोन दरवाजे उघडले; नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरू 

Spread the love

 

 

अंबाजोगाई -: अंबाजोगाई शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य भिस्त असलेले धनेगांव येथील मांजरा धरण पूर्णत: भरले आहे. परतीच्या पावसाने धरण पूर्णत भरले आहे.

बुधवारी दुपारी दुपारी साडेबारा वाजता मांजरा धरणाचे दोन दरवाजे ०.२५ सेंटीमीटरने उघडण्यात आले असून नदीत १७२० क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.

धरण भरल्याची सुखद बातमी सर्वत्र झाल्याने धरणातील पाणी पाहण्यासाठी अंबाजोगाई तालुका व परिसरातील नागरिक व पर्यटक धरणावर मोठी गर्दी करू लागले आहेत.

शेतकºयाच्या सिंचनासाठी १९८० साली मांजरा धरणाची उभारणी झाली. धरणाची क्षमता २२४ द.ल.घ.मी. आहे. मांजरा धरणात केज व उस्मानाबाद परिसरातील शेतकºयांच्या जमिनी मोठ्या प्रमाणात संपादित करण्यात आल्या व हे धरण अस्तित्वात आले. मांजरा धरण परिसरातील शेतकºयांसाठी वरदान ठरले होते. मात्र गेल्या वीस वर्षात अंबाजोगाई, केज, धारूर, कळंब,लातूर शहरासह ४० गावच्या पाणीपुरवठा योजना धरणातून सुरू आहेत. हे धरण शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित राहिल्याने धरणातील पाण्याचा मोठा फटका शेतकºयांना बसला. धरणाची क्षमता मोठी असूनही धरणात येणारा पाण्याचा प्रवाह कमी व लांब पल्ल्याचा असल्याने साध्या पावसात धरण भरणे मोठे दुरापास्त होते. गेल्या ४४ वर्षात या वर्षासह केवळ १५ वेळेसच मांजरा धरण भरले आहे. जेव्हा धरण भरते त्यावेळेसच शेतकºयांना २ ते ३ टप्प्यात १०० ते १२५ द.ल.घ.मी. पाणी उजव्या व डाव्या कालाव्यातून सिंचनासाठी सोडले जाते. मात्र धरणच भरत नसल्याने याचा मोठा फटका शेतकºयांना बसतो. या धरणावर ७० गावच्या लोकांनी मोठमोठ्या जलवाहिन्या पाणी खेचण्यासाठी लाखो रुपये खर्च करून टाकल्या मात्र त्यांचा हा खर्चही पाण्याअभावी निघणे मुश्कीलीचे ठरते.

मुबलक पडणाºया पावसामुळे मांजरा धरणाच्या पाणीसाठ्यात जून महिन्यांपासूनच हळूहळू वाढ होऊ लागली. कोरडे पडत आलेले धरण पूर्णत: भरण्यासाठी ४ महिन्याचा कालावधी लागला. हे धरण भरल्यामुळे आगामी तीन वर्षांसाठी तरी मोठा दिलासा मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नका